
Bharat Bandh LIVE : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?
मुंबई । मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू, लाईफ लाईन लोकलसेवा, बेस्टच्या फेऱ्या सुरळीत, टॅक्सी, रिक्षा, मोनो, मेट्रोही सुरूच, राज्यात बँकांचे व्यवहार सुरू
मुंबई । च्या डब्बेवाल्यांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शविला आहे. सोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याची घोषणा केली.
प्रयागराज । समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रेल्वेसमोर झोपले आणि रेल्वे बंद केली
नवी दिल्ली । -भारत बंदमुळे दिल्लीतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टिकरी, झौदा, धनसा सीमा वाहतुकीसाठी बंद आहेत. बडूसराय सीमा हलकी वाहनांसाठी खुली आहे. झटिकारा सीमा केवळ दुचाकी वाहनांसाठी खुला आहे. हरियाणाला जाण्यासाठी दौराळा, कापशेरा सीमा उघडली आहे. बिजवासन, पालम विहार आणि दुंधेरा सीमा उघडल्या आहेत.
Bihar: Rashtriya Janata Dal (RJD) workers burn a tyre at Ganj Chowk in Darbhanga, in protest against Central Government, and show their support to #BharatBandh called by farmer unions. pic.twitter.com/kea7UwpQlN
— ANI (@ANI) December 8, 2020
हरियाणा । ‘भारत बंद’ पाहता हरियाणा पोलिसांनी आवाहन केलेआहे. हरियाणातील विविध रस्ते आणि महामार्गांवर धरणे आंदोलन करणारे गट दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नूह आणि नारनौल वगळता राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यात मोठ्या किंवा लहान मार्गावर वाहतूक ठप्प होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
– बंदचा अंशत: परिणाम दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमध्ये दिसून येत आहे.
Karnataka: Congress leaders protest in support of #BharatBandh called by farmer unions, raise slogans against the Centre & show black flags, in front of Gandhi statue at Vidhana Soudha in Bengaluru.
Party leaders Siddaramaiah, BK Hariprasad, Ramalinga Reddy and others present. pic.twitter.com/YptI0ENQlg
— ANI (@ANI) December 8, 2020
– पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी रोखण्यात आली होती. जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी थांबली गेली.
दिल्ली । भारत बंदचा फटका देशातील अनेक राज्यांत दिसून येत आहे. दिल्लीच्या अनेक सीमा बंद आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिहारमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी बस आणि गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पंजाबच्या मोहालीमध्ये टोल नाका बंद होता.
अमृतसरमध्ये बंदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
ठाणे । भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane) करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
नागरिक देखील शेतकऱ्याच्या पाठीशी – राजू शेट्टी
कोल्हापूर । महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात भारत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल मला समाधान वाटतं आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. एका अर्थाने सर्वसामान्य नागरिक देखील शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ठ झाल्याच देखील शेट्टी म्हणालेत.
कल्याण । शेतकरी संघटनांनी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कल्याण एपीएमसी मार्केटने कडकडकीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे. कल्याण स्टेशन परिसरात नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत आहे. तसेच कल्याण एसटी डेपोमध्येही नेहमीप्रमाणे कामावर जाणाऱ्या लोकांची आणि बाहेरगावी जाणाऱ्या बसेसची गर्दी कमी आहे.
रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद नाही
रायगड । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही . आज सकाळपासून हॉटेल्स , भाजीविक्रेते स्टॉल व इतर सर्व प्रकारची दुकाने उघडली आहेत . शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या अलिबाग शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले . जिल्ह्याच्या अन्य भागातही बंदला फारसा प्रतिसाद नाही. लॉक डाऊनमुळे त्रस्त झालेले व्यावसायिक बंदला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत नाहीत , असं चित्र आहे . एसटी वाहतूक सुरू आहे.
पंढरपुरात बाजार समिती बंद
पंढरपूर, पुणे । कोल्हापुरात देखील भारत बंदला सकाळच्या सत्रामध्ये समिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तर पंढरपूरमधल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बाजार समिती बंद ठेवली आहे. तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीसह कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. असं असताना या मोर्चाला परवानगी देण्यात आली नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात भारत बंदची हाक महाविकास आघाडीने दिली असली तरी पुणे बंगरुळू महामार्गावर वाहतूक सुरू आहे.
West Bengal: BJP has called a 12-hour bandh in North Bengal today, over the death of a party worker during its protest against the state government in Siliguri yesterday.
Visuals from Siliguri. pic.twitter.com/oVZuFAmRbb
— ANI (@ANI) December 8, 2020
ओडिशा । डावे राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भुवनेश्वर रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविली.
Odisha: Left political parties, trade unions and farmer unions stop trains at Bhubaneswar Railway Station.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre’s #FarmLaws. pic.twitter.com/C63X69FSlE
— ANI (@ANI) December 8, 2020
आंध्र प्रदेश। शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंद पाठिंबा देत डाव्या राजकीय पक्षांनी विजयवाड्यात आंदोलन केले, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निदर्शने केलीत.
Andhra Pradesh: Left political parties stage a protest in Vijayawada, in support of today’s #BharatBandh called by farmer unions, against Central Government’s #FarmLaws. pic.twitter.com/PsbrFNxlaL
— ANI (@ANI) December 8, 2020
कोलकाता । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिष्ट पार्टीच्यावतीने जादवपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
पश्चिम बंगाल: लेफ्ट पार्टियों ने कोलकाता के जादवपुर में किसानों के भारत बंद के समर्थन में विरोध प्रदर्शन किया। #BharatBandh pic.twitter.com/t9MdNT9EEV
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2020
बंदचा परिणाम
पुणे । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक
कडकडीत बंद
नवी मुंबई । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.
नवजीवन एक्सप्रेस मलकापूर येथे रोखली
बुलडाणा । भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलीय.सकाळी ६.४० वाजता चेन्नई – अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Maharashtra: Swabhimani Shetkari Saghtana staged ‘Bharat Bandh Rail Roko’ protest and briefly stopped a train today in Malkapur of Buldhana dist. They were later removed from the tracks by Police & detained.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre’s #FarmLaws pic.twitter.com/syREnd7Iez
— ANI (@ANI) December 8, 2020
पुण्यात दुकाने बंद
पुणे । शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) पुणे येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पुण्यात व्यापारी महासंघाने (Pune Chamber of Commerce) आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकानं दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत. तर आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा । ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, प्रिटी झिंटा, तापसी पन्नू शेतकऱ्यांच्या पाठीशी#FarmersProtest #Bollywoodhttps://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/48EnkORkU2
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 8, 2020
मुंबई : शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार केवळ चर्चा करत आहे. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) या बंदला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.
दरम्यान, १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरकीडे केंद्र सरकारने २० शेतकरी संघटनांना सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंजाबच्या २० शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची काल भेट घेतली.
संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद
मुंबईत मात्र सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहणार आहे. बेस्ट बसेस ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय. खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवल्या जाणार आहेत. शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई परिसरातल्या टॅक्सीही सुरू राहणार असल्याची माहिती टॅक्सी संघटनांनी दिली आहे. तर संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
आंदोलनाला बँक संघटनांचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनाला बँक संघटनांनी पाठींबा दिला आहे. मात्र आज पुकारलेल्या भारत बंद दरम्यान बँका सुरूच राहणार आहेत. ‘भारत बंद’मध्ये बँकांचा सहभाग असणार नाही. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरुच राहाणार आहेत.
राज्यातील बाजार समित्याही मार्केट बंद
आजच्या भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.